Posted by वृत्तभारती
Monday, August 11th, 2014
औरंगाबाद, [१० ऑगस्ट] – न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्यातील १८ हजार अंशकालीन शिक्षकांना सेवेत कायम करुन घेण्याऐवजी टोलवा टोलवी करणारे राज्यसरकार या आदेशाचे पालन करीत नाहीत, युतीची सत्ता येताच तुम्हाला कायम करु अशी ग्वाही विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून उपोषणास बसलेल्या राज्य अंशकालीन शिक्षकांना रविवारी दिली. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असलेल्या कार्यक्रमानिमित्त विनोद तावडे हे शहरात आले होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गेल्या सात...
11 Aug 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, July 27th, 2014
=महाराष्ट्र सदनातील घटना, नितीन गडकरी यांचा आरोप= नाशिक, [२६ जुलै] – निवडणुका आल्यानंतर जातीयतेचे कार्ड खेळणे कॉंगे्रस व राष्ट्रवादी कॉंगे्रसची जुनीच सवय आहे. महाराष्ट्रात तीन महिन्यांवर विधानसभेची निवडणूक असल्याने या दोन्ही कॉंगे्रसने महाराष्ट्र सदनातील घटनेला जातीय रंग देण्याचे प्रयत्न चालविले आहेत, असा आरोप केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, राष्ट्रीय महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केला. महाराष्ट्र सदनातील प्रकार इतका गंभीर नव्हता. आपण ज्याला चपाती खायला सांगत आहो,...
27 Jul 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, June 3rd, 2014
परळी वैजनाथ, [३ जून] – गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच, मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथजवळ असलेले नाथ्रा हे त्यांचे गाव दु:खाच्या सागरात बुडाले. आपला लाडका नेता आता आपल्याला कधीच दिसणार नाही, या विचारानेच गावातील प्रत्येक व्यक्ती हळहळली होती. मुंडे यांच्या निधनाचे वृत्त वार्यासारखे पसरले. आणि लोक समुहा-समुहाने रस्त्यावर येत होते. या वृत्तावर नाथ्रा आणि परळी वैजनाथमधील कुणाचाही विश्वास बसत नव्हता. पण, अखेर वास्तव त्यांना स्वीकारावे लागले. प्रत्येकाच्याच घरातील...
3 Jun 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, June 3rd, 2014
औरंगाबाद, [३ जून] – महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात भाजपाची पाळेमुळे मजबूत करणारे आणि लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाराष्ट्राचा गड सर करण्याचा जणू निर्धारच व्यक्त करणारे भाजपाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे आज सकाळी अचानक झालेले निधन महाराष्ट्राला आणि समाजमनाला धक्का देऊन गेले आहे. भाजपाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात रुजवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. प्रमोद महाजन हे युतीचे, तर मुंडे महायुतीचे शिल्पकार आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना एक आठवड्यापूर्वीच केंद्र सरकारमध्ये ग्रामीण...
3 Jun 2014 / No Comment /