किमान तापमान : 29.33° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 89 %
वायू वेग : 2.89 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
29.12°C - 30.99°C
sky is clear28.81°C - 31.87°C
sky is clear28.58°C - 31.35°C
few clouds28.47°C - 30.26°C
few clouds28.66°C - 30.17°C
broken clouds28.35°C - 29.99°C
broken cloudsजम्मू, (२०सप्टेंबर) – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केलेल्या दाव्याला आव्हान दिले आहे. जम्मू-काश्मीरच्या ५० टक्के लोकांनी निवडणुकीत नोटा बटण दाबले तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे त्यांनी म्हटले आहे. काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केलेल्या सर्वेक्षणावर ओमर अब्दुल्ला यांनी ही माहिती दिली. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी एका सर्वेक्षणाचा हवाला देत ८० टक्के लोकांना मतदान करायचे नाही, असे सांगितले. ओमर अब्दुल्ला म्हणाले, ’जर ८० टक्के लोकांना निवडणुका नको असतील तर त्यांनी मतदानाला जावे आणि नोटा बटण दाबावे. जम्मू-काश्मीरच्या ५० टक्के लोकांनी बटण दाबले तर मी राजकारण सोडून राज्यपालपदी विराजमान होईन.
ओमर अब्दुल्ला म्हणाले, ’कुठे आहेत ते ८०% लोक ज्यांना निवडणुका नको आहेत कारण मला इतक्या टक्के लोकांमध्ये राग आणि नाराजीशिवाय काहीच दिसत नाही’. अर्थात गाडी बंगल्यात राहणार्यांना निवडणुका नको असतात, पण बाकीच्या जनतेला निवडणुका हव्या असतात आणि बटण दाबून आपला राग काढायचा असतो. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, डबल इंजिन सरकारच्या खोट्या आश्वासनांमुळे काश्मीरमधील जनता संतप्त आहे. ते पुढे म्हणाले की, महागाईची परिस्थिती आपल्या सर्वांसमोर आहे. रोज काही वस्तूंच्या किमती वाढत आहेत. जिथे रोजगार आहे तिथे फसवणूक होते. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, लोकांमध्ये मालमत्ता कराबद्दल नाराजी आहे. ते म्हणाले की, सुरक्षेची परिस्थिती तुमच्या सर्वांसमोर आहे.