किमान तापमान : 29.14° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 2.27 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
28.82°C - 31.51°C
sky is clear28.64°C - 30.86°C
sky is clear28.63°C - 29.86°C
sky is clear28.62°C - 29.7°C
broken clouds28.45°C - 29.61°C
broken clouds28.69°C - 29.77°C
light rainजयपूर, (१२ जानेवारी) – मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शुक्रवारी सांगितले की, भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि यामध्ये देशातील चार्टर्ड अकाउंटंट्सचे (सीए) महत्त्वाचे योगदान आहे. शर्मा म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेला गती आणि दिशा देण्यासाठी सीएचे महत्त्व सर्वश्रुत आहे आणि ज्याप्रमाणे नागरिकांच्या आरोग्यासाठी डॉक्टर आवश्यक आहेत, त्याचप्रमाणे देशाच्या आर्थिक आरोग्यासाठीही सीए आवश्यक आहेत.
जयपूर येथे आयोजित चार्टर्ड अकाउंटंट्सच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला मुख्यमंत्री ’वेद’ संबोधित करत होते. देशभरातील आणि जगभरातील सीएला संबोधित करताना ते म्हणाले की, सीए आपल्या आर्थिक ज्ञान आणि कौशल्याचा वापर करून देशाच्या आर्थिक विकासात आणि स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. या परिषदेत होणारी चर्चा राज्याच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावेल. तंत्रज्ञान आणि अकाउंटिंगमधील नवीन बदलांमुळे उद्भवणार्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि परस्पर ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी अशा परिषदा खूप उपयुक्त आहेत.
राज्याच्या हिताच्या दृष्टीने आर्थिक व्यवस्थापनाच्या रोडमॅपशी संबंधित सूचना देण्याचे आवाहन त्यांनी परिषदेत उपस्थितांना केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आयसीएआय (इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया) नियमानुसार चार्टर्ड अकाउंटन्सी चालवण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. ते म्हणाले की, यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या सीएंना बक्षीस दिले, तसेच राजस्थानच्या चार्टर्ड अकाउंटंट्सच्या डिरेक्टरीचेही प्रकाशन केले.