किमान तापमान : 28.85° C
कमाल तापमान : 30.28° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 78 %
वायू वेग : 1.68 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.28° C
28.94°C - 32.15°C
sky is clear28.65°C - 31.48°C
sky is clear28.57°C - 30.39°C
sky is clear28.58°C - 30.33°C
broken clouds28.41°C - 30.14°C
broken clouds28.64°C - 30.26°C
light rain– त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचा आरोप,
अगरतळा, (१३ डिसेंबर) – यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा नेते व कार्यकर्त्यांना जिवंत गाडण्यासाठी माकपाने जमिनीत खड्डे खणले होते, असा गंभीर आरोप त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी केला. भाजपाने सलग दुसर्यांदा निवडणूक जिंकल्याने माकपाचा डाव उधळण्यात आला, असा दावा साहा यांनी खोवाई जिल्ह्यातील बाजार कॉलनीतील एका कार्यक्रमात केला. १२ डिसेंबर १९९६ च्या पहाटे एनएलएफटी बंडखोरांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या २६ गावकर्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मात्र, माकपाने हा आरोप खोटा असल्याचे सांगत गैरभाजपा पक्षांमध्ये मतांचे विभाजन झाल्यामुळे भाजपाने निवडणुका जिंकल्याचे म्हटले आहे. माकपाने ईशान्येकडील राज्यांत दहशतवादी डावपेच आखून अक्षम्य गुन्हा केल्याचा आरोप करून, साहा म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी डाव्या पक्षाशी हातमिळवणी करणार्या काँग्रेसची कीव करावी तेवढी थोडीच आहे. कम्युनिस्ट राजवटीत काँग्रेसचे खूप नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, माकपाचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी म्हणाले की, पक्ष हिंसाचार किंवा दहशतवादावर विश्वास ठेवत नाही. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाल्याने जनादेश मिळाला नाही. मतांच्या विभाजनाचा फायदा घेऊन त्यांनी सरकार स्थापन केले. ते चिंतेत आहेत आणि म्हणूनच त्यांनी असे निराधार आरोप केले, असे साहा म्हणाले.