किमान तापमान : 29.33° C
कमाल तापमान : 30.44° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 85 %
वायू वेग : 2.89 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.44° C
29.12°C - 30.99°C
sky is clear28.81°C - 31.87°C
sky is clear28.58°C - 31.35°C
few clouds28.47°C - 30.26°C
few clouds28.66°C - 30.17°C
broken clouds28.35°C - 29.99°C
broken clouds-मंत्रिमंडळ विस्तार लवकरच : विष्णुदेव साय,
नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – छत्तीसगडचे मुख्यमंत्री झाल्यानंतर विष्णू देव साय यांनी पहिल्यांदाच दिल्लीला भेट दिली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी नवी दिल्लीहून परतल्यानंतर रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली आहे. बैठकीत काही चर्चा झाल्या. लवकरच मंत्रिमंडळ स्थापन होईल. मंत्रिमंडळात नवीन आणि जुन्या अशा दोन्ही चेहर्यांचा समावेश केला जाईल. जागा मिळेल.
साय म्हणाले, काल संध्याकाळी मी दिल्लीला गेलो होतो. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची तिथे भेट घेतली आणि काही चर्चा केली. राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळात नव्या चेहर्यांच्या समावेशाबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, जुन्या आणि नव्या चेहर्यांचा मिलाफ असेल. मंत्रिमंडळ साठी थोडी वाट पहावी लागेल पण ते लवकरच होईल. छत्तीसगडच्या मंत्रिमंडळात आणखी दहा सदस्यांचा समावेश केला जाऊ शकतो. घटनात्मक नियमांनुसार, ९० सदस्यीय विधानसभेच्या छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त १३ मंत्री असू शकतात.
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच : विष्णुदेव साय
रायपूर – आपल्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार असून, यात नवीन आणि जुन्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी माहिती छत्तीसगडचे मुख्यमंत्र विष्णुदेव साय यांनी सोमवारी दिली. नवी दिल्ली येथून परतल्यानंतर ते येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते.
साय यांनी १३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मी रविवारी सायंकाळी दिल्लीला गेलो. तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली व काही चर्चा केली. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे, असे त्यांनी सांगितले. विस्तारात नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, नवीन आणि जुन्या चेहऱ्यांचा समावेश असलेले मिश्र मंत्रिमंडळ असेल. थोडा वेळ वाट पहावी लागले, पण लवकरच विस्तार केला जाईल. राज्यात धानखरेदी सुरू असून, प्रती एकर २१ क्विंटल धानाला ३,१०० रुपये प्रती क्विंटलचा भाव दिला जाईल, या भाजपाने दिलेल्या वचनावरील विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना साय म्हणाले, हे वचन म्हणजे मोदींची गॅरंटी आहे आणि ते पूर्ण केले जाईल.