|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 19:02
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.99° C

कमाल तापमान : 30.43° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 5.14 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Tuesday, 18 Jun

28.88°C - 31.99°C

moderate rain
Weather Forecast for
Wednesday, 19 Jun

28.52°C - 30.49°C

moderate rain
Weather Forecast for
Thursday, 20 Jun

28.46°C - 30.34°C

moderate rain
Weather Forecast for
Friday, 21 Jun

28.94°C - 30.89°C

light rain
Weather Forecast for
Saturday, 22 Jun

28.9°C - 30.45°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 23 Jun

28.53°C - 30.1°C

moderate rain
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » चीन घेणार फिंगर-८ मधून माघार

चीन घेणार फिंगर-८ मधून माघार

नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर – भारत आणि चीनच्या कमांडर पातळीच्या आठव्या फेरीत झालेल्या चर्चेवेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याची इच्छा चीनने व्यक्त केली आहे. याअंतर्गत पूर्व लडाखमधील पेगॉंग त्सो तलावाच्या उत्तर किनार्‍यावरील फिंगर-८ मधून पीपल्स लिबरेशन आर्मी माघार घेणार असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली.
चुशूलमध्ये ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या चर्चेत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पेगॉंग त्सो हा भाग भारतीय हद्दीत असून, फिंगर-८ मधून माघार घेण्यास चीन राजी झाला आहे. १४ व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल पी. जी. के. मेनन यांनी या बैठकीत भारताचे नेतृत्व केले. सकाळी ९.३० वाजता सुरू झालेली ही बैठक जवळपास १० तास चालली.
आठव्या फेरीत दोन्ही कमांडरची समोरासमोर चर्चा झाली. या चर्चेवेळी चीनने माघार घेण्याची इच्छा व्यक्त केली, असे या घडामोडींवर नजर ठेवून असलेल्या एका अधिकार्‍याने सांगितले. चीनची सैन्यमाघारीची प्रक्रिया पेंगॉंग त्सोपासून सुरू होऊ शकते, अशी माहिती दुसर्‍या एका अधिकार्‍याने दिली. पेंगॉंग त्सोच्या उत्तर व दक्षिण किनार्‍यावरून एकाच वेळी माघारीची प्रक्रियेवर बैठकीत चर्चा झाली. डेप्सांगसह इतर ठिकाणांवर नंतर चर्चा होणार आहे, असे या अधिकार्‍याने सांगितले.
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी चीनमधील त्यांच्या समकक्ष वांग यी यांच्यासोबत मॉस्कोत केलेल्या चर्चेनंतर चीनची भूमिका बदलली आहे. या बैठकीपूर्वी दोन्ही बाजूंचे लष्कर समोरासमोर सज्ज होते. मात्र, मॉस्को येथील बैठकीनंतर, प्रत्येक ट्रकच्या वाहतुकीची माहिती दोन्ही देशांनी परस्परांना देणे सुरू केले. स्थानिक लष्करी कमांडरांना संवाद साधणे अनिवार्य करण्यात आले. त्यानंतर दोन्ही देशांनी समोरसमोर असलेले रणगाडे मागे घेतले, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.
भारतीय गस्तीवर आक्षेप
भारतीय लष्कराचे पथक फिंगर-८ परिसरात गस्त घालत असून, या गस्तीवर चीनने आक्षेप घेतला, अशी माहिती या अधिकार्‍याने दिली. गस्तीच्या मुद्यावरही बैठकीत चर्चा झाली आणि कोणत्याही संघर्षाविना गस्त कशी घालावी, यावर बैठकीत तोडगा काढण्यात आला. या चर्चेतील तपशील मंजुरीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Posted by : | on : 11 Nov 2020
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g