किमान तापमान : 28.5° C
कमाल तापमान : 29.51° C
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 80 %
वायू वेग : 3.54 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.5° C
27.99°C - 30.43°C
28.48°C - 30.13°C
28.35°C - 30.44°C
29.09°C - 30.93°C
29.14°C - 30.26°C
28.21°C - 29.74°C
अशा लोकांना ओळखा, सावध राहा: पंतप्रधानांनी काढला विरोधकांचा जोरदार चिमटा,
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी – श्रमजीवी, बुद्धिजीवी यासोबतच गेल्या काही दिवसांत देशात एक नवीन जमात समोर आली आहे, ती म्हणजे आंदोलनजीवी. या जमातीचे लोक आपल्याला सर्वत्र दिसतील. वकिलांचे आंदोलन असो, विद्यार्थ्याचे आंदोलन असो की, कामगारांचे, या जमातीचे लोक आपल्याला सर्वच ठिकाणी दिसतील. कधी हे लोक पडद्यासमोर असतात, तर कधी पडद्यामागे, असा जोरदार चिमटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी राज्यसभेत काढला.
यांची पूर्ण टोळी आहे, जे आंदोलनााशिवाय राहू शकत नाही. अशा लोकांना देशवासीयांनी ओळखले पाहिजे, त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, या शब्दांत मोदी यांनी धंदेवाईक आंदोलनकत्यारची खिल्ली उडवली.
मोदी आहे, त्याचा फायदा घ्या कोरोनामुळे तुम्ही कित्येक महिन्यांपासून घरात अडकून पडले आहात. कुठेही बाहेर जाता आले नाही. त्यामुळे घरातही तुमची किचकिच चालू असेल, पण कृषी कायद्याच्या निमित्ताने तुम्हाला संसदेत भाषण करताना माझ्यावर हल्ला चढविण्याची संधी मिळाली, या निमित्ताने तुम्हाला तुमचा संताप बाहेर काढता आला. त्यामुळे तुमचे मन आता हलके झाले असेल, तुम्हाला घरातही आनंदाने जगता आले, यासाठी मी निमित्तमात्र ठरलो, याचा मला आनंद आहे. हा जो आनंद तुम्हाला मिळाला, याबद्दल मी तुमच्या कामी आलो, हे माझे सौभा१?२य आहे, असा आनंद तुम्ही वारंवार घ्या, अशी माझी विनंती आहे. चर्चा करा, सभागृहात सतत चर्चा करा, सभागृह जिवंत ठेवा, मोदी आहे, तर त्याचा फायदा घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला.
कृषी सुधारणांसाठी सवारनी सहकार्य करावे कृषी क्षेत्रातील सुधारणांची संधी तुम्ही दिली पाहिजे. ही वेळ कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्याची आणि देशाला विकासाच्या दिशेने नेण्याची आहे. ही वेळ देशाला पुढे नेण्याची आहे, मागे नेण्याची नाही. जेव्हा देशात कोणत्याही सुधारणा केल्या जातात, त्याला विरोध होतोच. हरितक्रांतीच्या प्रस्तावालाही सुरुवातीला विरोध झाला होता. कृषी सुधारणांसाठी विरोधी पक्षांनीही सहकार्य करावे. या सुधारणांनी कृषी क्षेत्रात किती बदल होतात, ते आपण पाहिले पाहिजे. यात कोणतीही कमी आणि कमजोरी आढळली, तर ती दूर केली जाईल, असे मोदी यांनी सांगितले.
नव्या कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या अत्याधुनिक होतील, त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली. कोणत्याही कायद्यात वेळोवेळी सुधारणा होतच असतात. चांगल्या सूचना स्वीकारणे, हा लोकशाही प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे. कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी सवारनी सहकार्य करावे, आंदोलनकत्यारनीही. एवढ्या मोठ्या देशात जेव्हा कोणतेही बदल होतात, तेव्हा सुरुवातीला संभ्रमाचे आणि गांेंधळाचे वातावरण निर्माण होतच असते. कृषी क्षेत्राच्याही काही समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण आपल्याला सगळ्यांना मिळून करायचे आहे. आता आपल्याला फारकाळ थांबता येणार नाही, नव्या उपाययोजनांसह आपल्याला समोर जावेच लागेल, असे मोदी म्हणाले.
देशातील लोकशाही समजून घ्या काही लोक आपल्या देशातील लोकशाहीवर सतत टीका करीत असतात. ही लोकशाही आधी समजून घ्या. आपली लोकशाही अतिशय मजबूत आहे. तिचे काही सिद्धांत आहेत आणि देशातील नागरिक हेच लोकशाहीचे खरे आधारस्तंभ आहेत, ताकद आहे, अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांवर हल्ला चढविला.