|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.85° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 1.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.21°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain

भारत अधिक ताकतीने जपानसोबत उभाः पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत अधिक ताकतीने जपानसोबत उभाः पंतप्रधान नरेंद्र मोदीनवी दिल्ली, (०४ जानेवारी) – नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारत अधिक ताकतीने जपानसोबत उभा आहे. प्रत्येक प्रकारचे सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. जपानमध्ये भूकंपानंतर निर्माण झालेल्या स्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी जपानचे आपले समकक्ष फुमियो किशिदा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली. आपला देश जपानच्या कठीण काळात ताकतीने उभा आहे. भारत भूकंपपीडितांना प्रत्येक प्रकारची मदत करण्यास तयार आहे. कारण, आपल्या देशाने सातत्याने अनेक वर्षांपासून जपानसोबतच्या...6 Jan 2024 / No Comment /

’आमच्या मित्रांना प्रत्येक यशासाठी’ शुभेच्छा; पुतिन यांनी केले मोदींचे अभिनंदन

’आमच्या मित्रांना प्रत्येक यशासाठी’ शुभेच्छा; पुतिन यांनी केले मोदींचे अभिनंदन– रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन कडून मोदींना रशिया भेटीचे निमंत्रण, नवी दिल्ली, (२८ डिसेंबर) – पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी, पंतप्रधान मोदी यांच्या विजयाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. विशेष म्हणजे हे अभिनंदन देशातून नाही तर परदेशातून येत आहे. भारताच्या जवळ असलेल्या रशियाकडून हे अभिनंदन करण्यात आले आहे. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, ते ’आमच्या मित्रांना प्रत्येक यशासाठी’...28 Dec 2023 / No Comment /

मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदला भारतात आणणार

मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदला भारतात आणणारनवी दिल्ली, (२८ डिसेंबर) – भारत सरकार पाकिस्तानचा मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदला भारतात आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी हाफिजला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी सरकारने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे केली आहे. पाकिस्तानी मीडिया इस्लामाबाद पोस्टनुसार, भारत सरकारने अधिकृतपणे हाफिज सईदचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला भारताकडून हाफिजच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची विनंती प्राप्त झाली आहे. हाफिज सईद हा मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. या हल्ल्यात अमेरिकनांसह...28 Dec 2023 / No Comment /

दहशतवादाबद्दल युनोत भारताने पुन्हा पाकिस्तानला फटकारले

दहशतवादाबद्दल युनोत भारताने पुन्हा पाकिस्तानला फटकारलेनवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – दहशतवादाबद्दल भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. सीमेपलीकडील दहशतवादामुळे भारताला झालेल्या मोठ्या नुकसानीचा संदर्भ देताना कंबोज म्हणाल्या की, दहशतवादी गट आपल्या देशाला लक्ष्य करण्यासाठी ड्रोनचा वापर करून अवैध शस्त्रांंची तस्करी करतात. ‘स्मॉल आर्म्स’ या विषयावरील खुल्या चर्चेत कंबोज बोलत होत्या. दहशतवादी गट आमच्या सीमेवरून शस्त्रांची तस्करी करून दहशतवाद आणि हिंसाचाराच्या...18 Dec 2023 / No Comment /

ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे भारतात स्वागत

ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे भारतात स्वागत– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले राष्ट्रपती भवनात स्वागत, नवी दिल्ली, (१६ डिसेंबर) – अरब जगतातील सर्वात जुने स्वतंत्र राज्य असलेल्या ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक हे त्यांच्या पहिल्या राज्य दौर्‍यावर भारतात आले आहेत. आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे राष्ट्रपती भवनात जोरदार स्वागत केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक द्विपक्षीय चर्चेसाठी दिल्लीतील हैदराबाद हाऊसवर पोहोचले. येथे...16 Dec 2023 / No Comment /

जगभरातील ५७ देशांना काश्मीरची चिंता वाटते!

जगभरातील ५७ देशांना काश्मीरची चिंता वाटते!– तब्बल ५७ देशांचे ‘काळजीपोटी’ निवेदन, नवी दिल्ली, (१३ डिसेंबर) – भारत सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी, जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर जगभरातील ५७ देशांना काश्मीरची चिंता वाटते आहे. विशेषत: भारत सरकारच्या निर्णयावर, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर, या इस्लामिक देशांना काश्मीरची चिंता वाटत असून, त्यांनी एक संयुक्त बयाण जारी केले आहे. ओआयसी म्हणजेच इस्लामिक सहयोग संघटनेने भारत सरकारने एकतर्फी निर्णय घेत कारवाई केल्याचा ठपका ठेवत, जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा...13 Dec 2023 / No Comment /

पन्नूच्या हत्येचा आरोप भारतीय धोरणांच्या विपरित

पन्नूच्या हत्येचा आरोप भारतीय धोरणांच्या विपरितनवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – अमेरिकेच्या न्याय विभागाने भारतीय नागरिकावर केलेल्या गंभीर आरोपावर भारताने उत्तर दिले आहे. भारताचा नागरिकाचा हत्येच्या एका कटाशी संबंध असल्याचा अमेरिकेने केलेला आरोप अतिशय चिंताजनक आणि भारतीय धोरणांच्या विपरित आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले. भारत सरकारचा कर्मचारी असलेला ५२ वर्षीय भारतीय नागरिकाने न्यू यॉर्क शहरातील एका नागरिकाच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप अमेरिकी न्याय विभागाने केला आहे. अमेरिकी न्याय...30 Nov 2023 / No Comment /

मोझांबिककडून भारताची ‘तूरकोंडी’

मोझांबिककडून भारताची ‘तूरकोंडी’– दरात तेजी राहणार, नवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – भारतातील तूरटंचाईचा आणि जगभरातील तुरीच्या अल्प उपलब्धतेचा फायदा घेत मोझांबिकने भारताला होणार्या तूर निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. अतिरिक्त नफ्यासाठी मोझांबिक भारताची ‘तूरकोंडी’ करण्याच्या प्रयत्नात आहे. देशांतर्गत बाजारात पुढील वर्षभर तुरीच्या दरात तेजी राहणार असली, तरीही फार दरवाढ होण्याची शक्यता नाही. इंडियन पल्सेस अ‍ॅण्ड ग्रेन्स असोसिएशनचे अध्यक्ष बिमल कोठारी म्हणाले की, मोझांबिक भारताला तूर निर्यात करणारा सर्वांत मोठा देश आहे. देशाच्या...30 Nov 2023 / No Comment /

जी-२० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताची अभूतपूर्व कामगिरी

जी-२० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताची अभूतपूर्व कामगिरीनवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – भारताने जी-२० च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बहुपक्षीयतेचे पुनरुज्जीवन करून, जागतिक दक्षिणेचा आवाज वाढवून, विकासाला पाठिंबा देऊन आणि सर्वत्र महिलांच्या सक्षमीकरणासाठी लढा देऊन विलक्षण कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ब्राझीलने १ डिसेंबरपासून जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारण्याआधी पंतप्रधान मोदींनी भारताच्या अध्यक्षतेखाली या प्रतिष्ठित गटाच्या भेटीवर प्रकाश टाकला आणि आपला देश आपल्या हितासाठी एकत्रितपणे काम करेल या आत्मविश्वासाने जबाबदारी सोपवेल असा विश्वास व्यक्त केला.गुरुवारी...30 Nov 2023 / No Comment /

आम्ही अमेरिकन गुप्तचर माहिती गांभीर्याने घेतली आहे

आम्ही अमेरिकन गुप्तचर माहिती गांभीर्याने घेतली आहेनवी दिल्ली, (२९ नोव्हेंबर) – खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या दाव्यावर भारत सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, आम्ही अमेरिकन गुप्तचर माहिती गांभीर्याने घेतली आहे आणि तपासासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत-अमेरिका सुरक्षा सहकार्यावर नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेने संघटित गुन्हेगार, बंदूक चालवणारे, दहशतवादी आणि इतर यांच्यातील संबंधाशी संबंधित इनपुट शेअर केल्यानंतर भारताने एक...29 Nov 2023 / No Comment /

चीनमध्ये एका वेगळ्या प्रकारच्या आजाराची प्रकरणे आली समोर

चीनमध्ये एका वेगळ्या प्रकारच्या आजाराची प्रकरणे आली समोर– आरोग्य मंत्रालयाची चेतावणी, चीनमुळे भारतात अलर्ट, नवी दिल्ली, (२४ नोव्हेंबर) – चीनमध्ये एका वेगळ्या प्रकारच्या आजाराची प्रकरणे समोर आली असताना चीनसह संपूर्ण जग कोरोना महामारीतून अद्याप पूर्णपणे बाहेर आले नव्हते. हा आजार लहान मुलांना होतो. त्याची प्रकरणे उत्तर चीनमध्ये दिसून आली. तथापि, भारत सरकार चिनी मुलांमध्ये पसरणार्‍या एच९एन२ प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आरोग्य मंत्रालय एच९एन२ चा प्रादुर्भाव आणि चीनमधील मुलांमध्ये पसरणार्‍या श्वसनाच्या आजारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. आरोग्य...24 Nov 2023 / No Comment /

मोदी-ट्रुडो यांच्या आभासी भेटीपूर्वी मोठे पाऊल

मोदी-ट्रुडो यांच्या आभासी भेटीपूर्वी मोठे पाऊलनवी दिल्ली, (२२ नोव्हेंबर) – भारत सरकारने कॅनडातील लोकांना दिलासा दिला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांना दिलासा देत भारत सरकारने आता कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात भारताने कॅनडासाठी व्हिसा सेवेवर बंदी घातली होती. खरे तर कॅनडात दररोज हिंदू मंदिरांवर तसेच भारतीय नागरिकांवर हल्ले होत आहेत. या सर्व घटनांनंतरही भारताने कॅनडातील व्हिसा सेवा बंद केलेली नाही. पण काही काळापूर्वी...22 Nov 2023 / No Comment /