Posted by वृत्तभारती
Friday, November 13th, 2020
नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यात आमचेच अतिरेकी सामील होते, अशी कबुली देत, या अतिरेक्यांची नावेही पाकिस्ताननेने जाहीर केली होती. मात्र, यात मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांची नावे नसल्याने, भारताने पकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला. पाकिस्तान मुंबई हल्ल्याबाबत आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेपासून दूर पळण्यासाठी खोट्या गोष्टी सांगत असल्याचा आरोपही भारताने केला आहे. मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात आहे आणि या हल्ल्याचा कटही याच देशात तयार झाला होता, हा दावा भारताने फार आधीपासूनच केला...
13 Nov 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, November 12th, 2020
नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा भारताला लवकर मिळावी, हे सुनिश्चित करण्यासाठी वेगाने काम केले जात आहे, असे रशियाने आज गुरुवारी सांगितले. या क्षेपणास्त्र यंत्रणेची पहिली खेप पुढील वर्षी देशात दाखल होण्याची अपेक्षा आहे. भारतीय लष्करासाठी २०० कामोव्ह केए-२२६टी हेलिकॉप्टर्सच्या उत्पादनासाठी भारत आणि रशिया संयुक्त उपक्रम स्थापन करणार असून, या अब्जावधी डॉलर्सच्या एका करारावर सध्या काम केले जात आहे तसेच दोन्ही लष्करी वाहतूक सहकार्य करारावरही काम करीत आहेत,...
12 Nov 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, November 12th, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – आसियान देशांत सामाजिक, डिजिटल आणि आर्थिक क्षेत्राचा समावेश असलेली जोडणी वाढवण्यास भारताचे सर्वाधिक प्राधान्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी भारत आणि आसियान देशांच्या परिषदेत सांगितले. प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धीसाठी एक सुसंगत प्रतिसाद देण्यासाठी आसियान आवश्यक असल्याचा आम्हाला विश्वास आहे. भारताच्या भारत-प्रशांत पुढाकार आणि आसियानचा भारत-प्रशांतकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात कितीतरी साम्य आहे. भौतिक, आर्थिक, सामाजिक, डिजिटल, वित्तीय, सामुद्री...
12 Nov 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 11th, 2020
नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर – भारत आणि चीनच्या कमांडर पातळीच्या आठव्या फेरीत झालेल्या चर्चेवेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याची इच्छा चीनने व्यक्त केली आहे. याअंतर्गत पूर्व लडाखमधील पेगॉंग त्सो तलावाच्या उत्तर किनार्यावरील फिंगर-८ मधून पीपल्स लिबरेशन आर्मी माघार घेणार असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. चुशूलमध्ये ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या चर्चेत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पेगॉंग त्सो हा भाग भारतीय हद्दीत असून, फिंगर-८ मधून माघार घेण्यास चीन राजी झाला आहे. १४...
11 Nov 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 11th, 2020
पंतप्रधानांचा चीन, पाकिस्तानला स्पष्ट संदेश, नवी दिल्ली, १० नोव्हेंबर – शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सर्व सदस्यांनी सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकतेचा सन्मान करायलाच पाहिजे, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी चीन आणि पाकिस्तानला दिला. एससीओ सदस्यांच्या आभासी स्वरूपात झालेल्या परिषदेत पंतप्रधान मोदी बोलत होते. पूर्व लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीनमध्ये निर्माण झालेला तणाव आणि पाकिस्तानने काश्मीर मुद्याचे आंतरराष्ट ?ीयीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
11 Nov 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, November 8th, 2020
नवी दिल्ली, ८ नोव्हेंबर – ज्यो बायडेन यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तर कमला हॅरिस यांचा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांनाही खास शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यो बायडेन यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. टि्वटमध्ये मोदी म्हणाले की, भव्य विजयाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेले योगदान कौतुकास्पद होते. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम...
8 Nov 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, November 7th, 2020
नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर – भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तीन देश गुंतवणूक आणि व्यापार वाढविण्यासोबतच यातील अडथळे दूर करण्यासाठी त्रिपक्षीय चौकट तयार करणार आहे. पुरवठा साखळी लवचिकतेचा (एससीआरआय) एक भाग म्हणून चर्चेला अंतिम रूप दिले जाणार असून, यात उद्योग आणि शैक्षणिक संस्था अधिक मजबूत करण्यासाठी त्रिपक्षीय प्रयत्न केले जाणार आहेत. तीनही देश औद्योगिक पार्क स्थापन करण्याचा विचार करीत आहे. व्यापार आणि गुंतवणुकीतील अडथळे दूर करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करण्याचा...
7 Nov 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, November 5th, 2020
राजनाथसिंह यांचा चीनला इशारा, नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर – मतभेदांवर भारताला शांततेत तोडगा हवा आहे आणि प्रादेशिक अखंडतेवर कुणी एकतर्फीपणा आणि आक्रमकता दाखवत असेल, तर आम्ही कोणतेही बलिदान द्यायला तयार आहोत, असा इशारा राजनाथसिंह यांनी आज गुरुवारी चीनला दिला आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावावर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या उच्चस्तरीय लष्करी चर्चेच्या आठव्या फेरीतील वाटाघाटींपूर्वी त्यांनी उपरोक्त वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित...
5 Nov 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 3rd, 2020
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर – व्याप्त काश्मीरसह गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या भागावर सध्या पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज सांगितले. गिलगिट-बाल्टिस्तानवर पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आहे आणि पाकिस्तान या प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्याचा प्रयत्न करीत आहे. व्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान भारताचा अविभाज्य भाग आहे, अशा दोनच शब्दांत आमचे सरकार याबाबतची भूमिका स्पष्ट करीत आहे, असे त्यांनी या मुद्यावर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले. भारताचे विभाजन व्हावे...
3 Nov 2020 / No Comment /