किमान तापमान : 29.02° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 74 %
वायू वेग : 5.25 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
28.07°C - 31.6°C
sky is clear28.44°C - 30.65°C
sky is clear28.13°C - 30.46°C
sky is clear27.94°C - 30.17°C
sky is clear27.65°C - 29.86°C
sky is clear27.75°C - 29.93°C
sky is clearनवरात्रीच्या दिवसात देवीची पूजा करणे विशेष फलदायी आहे. या काळात पूजेचे फायदेही लवकर मिळतात. याचे कारण म्हणजे माता दुर्गा नवरात्रीच्या काळात पृथ्वीवर निवास करते आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकते. नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये जिथे जिथे देवीच्या मूर्तीची किंवा चित्राची पूजा केली जाते, त्या सर्व ठिकाणी देवी निवास करते आणि आपल्या भक्तांची पूजा स्वीकारते. त्यामुळे माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्री अत्यंत पवित्र मानली जाते. नवरात्रीपूर्वीच लोक घरोघरी तयारीला लागतात. शारदीय नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला देवीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून काही वस्तू बाहेर टाका, कारण या गोष्टी घरात नकारात्मकता आणतात. चला त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया-
भंगलेल्या, तुटलेल्या मूर्ती
कोणत्याही देवाची भंगलेली कींवा तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये. हे शुभ मानले जात नाही. तुमच्या घरामध्ये भंगलेल्या मूर्ती असतील तर शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी त्या घरातून काढून पवित्र नदीत विसर्जित कराव्यात.
जुने जोडे आणि चप्पल
तुमच्या घरात जुने शूज आणि चप्पल पडलेले असतील, जे तुम्ही वापरत नसाल तर नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून काढून टाका. वास्तु तज्ज्ञांच्या मते जुने शूज आणि चप्पल घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते.
बंद घड्याळ
घरात बंद घड्याळ ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते आणि घरात नकारात्मकता वाढते. त्यामुळे नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातील बंद घड्याळ आणि इतर अनावश्यक वस्तू काढून टाका.
फुटलेल्या काच
तुटलेला काच किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, त्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते. त्यामुळे नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील काचेच्या तुटलेल्या वस्तू काढून टाका.
फाटलेली धार्मिक पुस्तके
वास्तुशास्त्रानुसार फाटलेली धार्मिक पुस्तके कधीही घरात ठेवू नयेत. कोणताही धार्मिक ग्रंथ फाटला असेल तर ते नवरात्रीच्या आधी वाहत्या पाण्यात विसर्जित करावे.