लोकसभा निवडणुकीत बनावट पासपोर्टने मतदान केल्याचे उघड

मुंबई, (११ जुन) – महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून चार बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्वजण बनावट कागदपत्रांद्वारे अनेक दिवसांपासून मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्यास होते. या चार बांगलादेशींचा एक साथीदार बनावट भारतीय कागदपत्रांद्वारे सौदी अरेबियात पळून गेला. हा बांगलादेशी गुजरातमध्ये राहून बनावट पासपोर्ट बनवत असे, असे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.

यावेळी बांगलादेशी नागरिकांनी या बनावट पासपोर्टचा वापर करून लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचेही तपासात समोर आले आहे. बनावट पासपोर्टचा वापर करून काही बांगलादेशी नागरिक भारतीय नागरिक असल्याचे दाखवून परदेशात नोकरी करत असल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी एटीएस अजूनही पाच जणांचा शोध घेत आहे. अटक केलेल्या बांगलादेशींच्या संगनमताची माहिती महाराष्ट्र एटीएस काढत आहे.
आरोपींची नावे-
रियाझ हुसेन शेख, वय- ३३
सुलतान सिद्दीक शेख, वय- ५४
इब्राहिम शफिउल्ला शेख, वय- ४६
फारुख उस्मान गनी शेख, वय- ३९

✎ Edit

Posted by - Admin,
on - मंगळवार, ११ जून, २०२४,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS