मनरेगा अंतर्गत मिळणार ७० हजार पगार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मुंबई येथील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत संचालक हे रिक्त असलेले पद भरले जाणार आहे. यात निवड झालेल्या व्यक्तीला तब्बल ७० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संदर्भातील अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा लागणार आहे. पद आणि या संदर्भातील इतर माहितीचा सविस्तर तपशील पुर्णतः वाचून समजून घ्यावा आणि त्यानंतरच अर्ज भरावा. १० मार्च २०२३ या तारखेच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.

on - शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३,
Filed under - युवा भारती
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा