तणावमुक्त राहण्यासाठी लोणचे खा

एखादी अनपेक्षित घटना पाहिली किंवा ऐकली की, लगेचच आपल्या मनावर ताण येतो, पोटात गोळा उठतो. यातून बाहेर पडायचे असेल तर लोणचे खाणे फायदेशीर ठरते, असे एका अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे.
याबाबत ७०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा नुकताच अभ्यास करण्यात आला. व्यायाम, जीवनशैली आणि आहारविषयक सवयी याविषयी सायकिएट्रिक रिसर्च संस्थेने या सातशे विद्यार्थ्यांची पाहणी केली. या पाहणीद्वारे असे आढळून आले की, देशी लोणचे किंवा अगदी मीठ लावलेली काकडी खाल्ल्याने लगेचच तणावमुक्ती मिळते. लोणचे आणि पचनसंस्थेचा घनिष्ट संबंध असून, ताण आल्यावर आतड्यांना वाटणारा दाह लोणचे खाल्ल्यावर शमतो असे दिसले. त्याचबरोबर मॅथ्यू हिलीमिअर या आणखी एका संशोधकाच्या पाहणीत तणावमुक्तीसाठी आंबवलेल्या पदार्थांचे भरपूर सेवन करणे देखील उत्तम असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.

✎ Edit

Posted by - Admin,
on - गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS