सीतारामन यांच्यासह ७ महिलांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश
सीतारामन आणि अन्नपूर्णा यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे, तर बाकीच्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत इराणी, पवार आणि ज्योती यांना अनुक्रमे अमेठी, दांडोरी आणि फतेहपूर या विद्यमान जागा गमवाव्या लागल्या. त्याचवेळी जरदोश, लेखी आणि भौमिक यांना भाजपाने तिकीट दिले नाही. सार्वत्रिक निवडणुकीत ७४ महिला उमेदवार विजयी झाले आणि ही संख्या २०१९ मध्ये निवडून आलेल्या ७८ महिला उमेदवारांपेक्षा थोडी कमी आहे. रविवारी संध्याकाळी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील ७१ सदस्यांनी शपथ घेतली अशी माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या नवीन केंद्रीय मंत्रिमंडळाचे वर्णन तरुण आणि अनुभवी लोकांचे उत्तम मिश्रण असे केले. जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असेही ते म्हणाले. मी १४० कोटी भारतीयांची सेवा करण्यासाठी आणि भारताला प्रगतीच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी मंत्रिमंडळासोबत काम करण्यास उत्सुक आहे, असे मोदींनी शपथविधीनंतर लगेचच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले. नवनियुक्त मंत्र्यांचे अभिनंदन करताना ते म्हणाले, ’मंत्र्यांचा हा संघ तरुण आणि अनुभवी लोकांचा उत्तम मिलाफ आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या परदेशी मान्यवरांचेही मोदींनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा