शेतकर्यांसाठी आता पीएम प्रणाम योजना!

नवी दिल्ली, (११ जुलै) – मोदी सरकारने कॅबिनेट बैठकीत पीएम प्रणाम योजनेला मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. पर्यायी खतांचा वापर वाढवणे आणि रासायनिक खतांचा वापर कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत ३.६८ लाख कोटी रुपये खर्च केले जातील. हा पैसा राज्यांना सबसिडी म्हणून दिला जाईल.
पीएम प्रणाम योजनेद्वारे खत अनुदानाचा वाढता बोजा कमी करणे आणि जमिनीचे आरोग्य सुधारणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे पिकांची पोषण गुणवत्ता कमी होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने या पॅकेजला मंजुरी दिली. यामध्ये पुढील तीन वर्षांत युरिया अनुदानावर ३.६८ लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेसाठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. २०२५ पर्यंत ३.६८ लाख कोटी रुपये खर्च केले जातील. हा खर्च खत अनुदानावर केला जाणार आहे.

on - मंगळवार, ११ जुलै, २०२३,
Filed under - कृषी भारती
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा