बांगलादेशबाबत परराष्ट्र मंत्री राज्यसभा, लोकसभेत बोलणार
या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. यासोबतच संसदीय कामकाज मंत्रीही या बैठकीत सहभागी झाले होते. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली. जयशंर म्हणाले की, बांगलादेश हा भारताचा खास शेजारी देश आहे. भारत आणि बांगलादेशचे संबंध चांगले आहेत. रिपोर्टनुसार शेख हसीना बांगलादेशातून पळून भारतात आल्या आहेत. ती येथून ब्रिटन किंवा इतर कोणत्याही देशात जाऊ शकते. शेख हसीनाबाबत भारताची भूमिका काय आहे? बांगलादेशात मार्शल लॉ लागू झाला, तर भारत त्याचा सामना कसा करणार? बांगलादेशच्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? चीन आणि पाकिस्तानची भूमिका काय असेल? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सर्व राजकीय पक्षांना माहिती देऊ शकतात.
बांगलादेशातील सत्तापालटाच्या संदर्भात संसदेत कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी मोदी सरकारला सर्व पक्षांना विश्वासात घ्यायचे आहे. बांगलादेशातील परिस्थितीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर लोकसभेत निवेदन देणार आहेत. सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. बांगलादेशातील सत्तापालटाचा भारतावर काय परिणाम होईल? या विषयावर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान मोदींसोबत या बैठकीला उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा